15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या शासनापासून मुक्त झाला. या दिवसाची आठवण म्हणून आणि स्वातंत्र्याचा वाढदिवस म्हणून आपण हा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतो . स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण आपली अशी एक राज्य पद्धती अमलात आणली. आपले संघराज्य निर्माण झाले. त्यामध्ये लोकांनी निवडलेले लोक प्रतिनिधी कारभार करणार होते. आता कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा नाही हे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संघराज्याची घटना लिहिली. त्याप्रमाणे आपले कायदे आपण बनवले. विविधतेत नटलेला भारत देश खूप जणांच्या बलिदानाने आज स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. आपल्याला आता कोणाचीही बंधन नाही. कोणाच्याही अधिपत्याखाली आपला भारत देश नाही. ताठ मानेने जगाचे नेतृत्व करण्यासाठी उभा आहे.